Wednesday, April 23, 2008

माझी जन्मठेप

माझी जन्मठेप
-विनायक दामोदर सावरकर
सन १९१०-१९११ मध्ये विनायक दामोदर सावरकरांवर दोन खटले चालून त्यांना दोन "जन्मठेप काळे पाणी"च्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचाच अर्थ अंदमानात ५० वर्षें सक्तमजूरी! उभ्या आयुष्याची राख-रांगोळी! दुसरा कोणी असता तर त्याने हायच खाल्ली असती. पण वीर सावरकर म्हणजे मूर्तिमंत धैर्याचे महामेरू; त्यांनी ही शिक्षा स्तिथप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. सावरकरांची शिक्षा २४-२-१९११ ला सुरू झाली व ६-१-१९२४ रोजी त्यांना काही अटींवर मुक्त करण्यात आले. हा ग्रंथ म्हणजे या १४ वर्षांचा इतिहास आहे. अंदमानातील कैदीजीवन, क्रूर छळ, रक्त ओकायला लावणाया शिक्षा, तुरूंगाधिकारी व इतर कैदी यांचे वर्तन, खुद्द सावरकरांचे आचार-विचार यांचे विस्तृत वर्णन यात आहे. संपूर्ण निवेदन प्रथम पुरूषात व भाषा प्रवाही, तेजस्वी असल्याने वाचक गुंगून जातो. हा ग्रंथ केवळ अंदमानातील हाल-अपेष्टांचे हृदयद्रावक वर्णन करत नाही तर ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी हे कष्ट सोसले ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रेरणा देतो.
(१५ मे २०००)

2 comments:

bhargavi said...

khup chan aahe he vachayla ajibaat kantala yet nahi

Anonymous said...

I like that boook..